YouTube

Wednesday 17 October 2018

श्रीमत भगवत गीता

एक घडलेली  गोष्ट ,,,,,              1979  सालची अशीच एक सकाळची वेळ होती,,, त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता, फारशी गर्दी नव्हती, काही लोकांचीच ये , जा, होती ,,, एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमत भगवत गीता वाचत होते,,, तेवढ्यात एक नास्तिक  तरुण उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला , आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली , गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती, त्या तरुणाने एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर , आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता, यावर मात्र त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण, पुढे काय करणार आहेस, पण अगदी शांतपणे ,,, त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे , सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा आटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे,,, पुढे मोठ्या तुसडेपणाने तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे, त्याने बरीच मुक्ताफळे उधळली, तरीही ती व्यक्ती शांतच होती,,, त्या गीता वाचणाऱ्या व्यक्ती ने उठून आसन गुंडाळले तसे एकदम 4  दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला,,, एवढं सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला, त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली , तेंव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की,      ज्या संस्थेत तू  करियर करण्यास संशोधन करण्यास आला आहेस ना त्या भाभा आटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे,,, डॉ, विक्रम साराभाई  ,,, त्यावेळी मात्र तो नास्तिक , देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला,,, तरीही डॉ, साराभाई शांतच,,, ते म्हणाले जर या जगात एखादी गोष्ट आहे तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे, मग ती आजची असो की महाभारत कालीन,,,  आणि त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते,,, तेंव्हा टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा, सर्व सायन्स देखील यातच आहे ,,,  ही गोष्ट घडली तेंव्हा भारतीय पातळीवरच्या विविध 13  रिसर्च संस्था या डॉ, साराभाईच्या नावावर होत्या तर तत्कालीन अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ, साराभाई यांची नियुक्ती केली होती ,,, चालू वर्ष हे डॉ, विक्रम साराभाई यांचे  99 वी जयंती वर्ष आहे,,, म्हणून एक आठवण ,,, त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन ,,,

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...